शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
3
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
4
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
5
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
6
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
7
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
8
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
9
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
10
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
11
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
12
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
13
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
14
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
15
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
16
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
17
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
18
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
19
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
20
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video

सरकारवर खुनाचा गुन्हा दाखल का करू नये?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 00:43 IST

कोल्हापूर : राज्यात गेल्या तीन वर्षांत ११ हजार शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. या आत्महत्येस जबाबदार धरून भाजप सरकारवर खुनाचा गुन्हा का नोंद करू नये? असा सवाल माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी रविवारी सायंकाळी येथे केला. कर्जमाफीसंदर्भात हे राज्य सरकार नुसत्याच घोषणा करत असून २०१९ ला सत्तेवर आल्यानंतर कॉँग्रेस सरकारच कर्जमाफी ...

कोल्हापूर : राज्यात गेल्या तीन वर्षांत ११ हजार शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. या आत्महत्येस जबाबदार धरून भाजप सरकारवर खुनाचा गुन्हा का नोंद करू नये? असा सवाल माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी रविवारी सायंकाळी येथे केला. कर्जमाफीसंदर्भात हे राज्य सरकार नुसत्याच घोषणा करत असून २०१९ ला सत्तेवर आल्यानंतर कॉँग्रेस सरकारच कर्जमाफी देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. याच कार्यक्रमात या सरकारकडून सहकार मोडून काढण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप आमदार सतेज पाटील यांनी केला.पाचगाव (ता. करवीर) येथील समृद्धीनगरच्या मैदानावर कॉँग्रेसच्या कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील नूतन सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार सोहळा व कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार सतेज पाटील होते. प्रमुख उपस्थिती प्रतिमा सतेज पाटील, ऋतुराज पाटील, करवीर पंचायत समिती सभापती प्रदीप झांबरे, उपमहापौर अर्जुन माने, स्थायी समिती सभापती संदीप नेजदार आदींची होती.हर्षवर्धन पाटील म्हणाले, कॉँग्रेस सरकारच्या काळात मी संसदीय कामकाज मंत्री असताना सध्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शेतकरी आत्महत्येस जबाबदार धरून सरकारवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. आता गेल्या तीन वर्षांत ११ हजार शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे मुनगंटीवार यांना प्रश्न आहे की तुमच्या सरकारवर खुनाचा गुन्हा का दाखल करू नये?कर्नाटक, पंजाब ही कॉँग्रेस शासित राज्ये शेतकºयांना कर्जमाफी देत असतील, तर महाराष्टÑाच्या मुख्यमंत्र्यांना कर्जमाफी द्यायला काय हरकत आहे? हे सरकार नुसत्याच घोषणा करीत आहे. त्यामुळे २०१९ला कॉँग्रेस सत्तेवर आल्यावरच शेतकºयांना कर्जमाफी मिळेल.नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत कॉँग्रेसच राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. सध्या वातावरण बदलत असून, २०१९च्या निवडणुकीत विधानसभेवर कॉँग्रेसचा तिरंगा फडकविल्याशिवाय राहणार नाही.सतेज पाटील यांनी नोटाबंदी, जीएसटीनंतर कोल्हापुरात प्राधिकरणाच्या माध्यमातून पाण्याची दरवाढ करण्याचे पाप भाजपने केले आहे, असा घणाघात करत हे सरकार सहकार मोडून काढण्यासह विविध पेन्शन योजना बंद केल्याचा आरोपही केला. ‘अच्छे दिन’ फक्त मोदींनाच असून जनता अजूनही त्याच्या प्रतीक्षेत असल्याचा टोला लगावला. जिल्हा परिषद, ग्रामपंचायतीमधील मिळालेल्या घवघवीत यशानंतर पुढील लक्ष्य विधानसभा ठेवून कामाला लागावे, असे आवाहनही केले.यावेळी ऋतुराज पाटील, हणबरवाडीच्या सदस्य सुप्रिया वाडकर, टोप संभापूरचे सरपंच प्रकाश जिरंगे, दºयाचे वडगावे सदस्य अनिल मुळीक यांनी आपल्या मनोगतातून कोल्हापूर दक्षिणमध्ये कॉँग्रेसचा आमदार होऊन सतेज पाटील कॅबिनेट मंत्री होतील, असा विश्वास व्यक्त केला. संयोजक व पाचगावचे सरपंच संग्राम पाटील यांनी प्रास्ताविक केले.स्वत:चा किल्ला शाबूत नसणाºयांनीआम्हाला शिकवू नये : ऋतुराज पाटीलज्यांना आपला स्वत:चा किल्ला शाबूत ठेवता आला नाही, त्यांनी आम्हाला राजकारण शिकवू नये, असा टोला ऋतुराज पाटील यांनी आजी-माजी आमदार महाडिक यांचे नाव न घेता लगावला. तसेच सतेज पाटील यांची या निवडणुकीच्या निमित्ताने क्रिकेट मॅचप्रमाणे पहिली ओव्हर सुरू झाली असून, सर्वांच्या ताकदीवर २०१९ची निवडणूक जिंकणारच, असेही ते म्हणाले.भोगम-रामाणेंकडून चांदीची तलवार भेटउद्योगपती रामचंद्र भोगम व माजी नगरसेवक मधुकर रामाणे यांच्या कुटुंबीयांकडून आमदार सतेज पाटील यांना या कार्यक्रमात चांदीची तलवार भेट देण्यात आली. यावेळी कळंबा सरपंच सागर भोगम, माजी महापौर अश्विनी रामाणे, आदी उपस्थित होते.कळंब्याचे दोन अपक्ष सदस्य कॉँग्रेसमध्येया कार्यक्रमात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत कळंब्यातील विजय खानविलकर व राजेंद्र गुरव या अपक्ष निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांनी आपल्या समर्थकांसह कॉँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.हे सरकार आंधळे आणि बहिरेसध्याचे सरकार हे आंधळे आणि बहिरे असल्याचा टोला माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी लगावला. यासाठी त्यांनी काही दिवसांपूर्वी विदर्भातील कीर्तनकार हंडे महाराज यांच्या कीर्तनातील संदर्भाचा दाखला दिला.

टॅग्स :Politicsराजकारण