शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सरकारवर खुनाचा गुन्हा दाखल का करू नये?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 00:43 IST

कोल्हापूर : राज्यात गेल्या तीन वर्षांत ११ हजार शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. या आत्महत्येस जबाबदार धरून भाजप सरकारवर खुनाचा गुन्हा का नोंद करू नये? असा सवाल माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी रविवारी सायंकाळी येथे केला. कर्जमाफीसंदर्भात हे राज्य सरकार नुसत्याच घोषणा करत असून २०१९ ला सत्तेवर आल्यानंतर कॉँग्रेस सरकारच कर्जमाफी ...

कोल्हापूर : राज्यात गेल्या तीन वर्षांत ११ हजार शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. या आत्महत्येस जबाबदार धरून भाजप सरकारवर खुनाचा गुन्हा का नोंद करू नये? असा सवाल माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी रविवारी सायंकाळी येथे केला. कर्जमाफीसंदर्भात हे राज्य सरकार नुसत्याच घोषणा करत असून २०१९ ला सत्तेवर आल्यानंतर कॉँग्रेस सरकारच कर्जमाफी देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. याच कार्यक्रमात या सरकारकडून सहकार मोडून काढण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप आमदार सतेज पाटील यांनी केला.पाचगाव (ता. करवीर) येथील समृद्धीनगरच्या मैदानावर कॉँग्रेसच्या कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील नूतन सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार सोहळा व कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार सतेज पाटील होते. प्रमुख उपस्थिती प्रतिमा सतेज पाटील, ऋतुराज पाटील, करवीर पंचायत समिती सभापती प्रदीप झांबरे, उपमहापौर अर्जुन माने, स्थायी समिती सभापती संदीप नेजदार आदींची होती.हर्षवर्धन पाटील म्हणाले, कॉँग्रेस सरकारच्या काळात मी संसदीय कामकाज मंत्री असताना सध्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शेतकरी आत्महत्येस जबाबदार धरून सरकारवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. आता गेल्या तीन वर्षांत ११ हजार शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे मुनगंटीवार यांना प्रश्न आहे की तुमच्या सरकारवर खुनाचा गुन्हा का दाखल करू नये?कर्नाटक, पंजाब ही कॉँग्रेस शासित राज्ये शेतकºयांना कर्जमाफी देत असतील, तर महाराष्टÑाच्या मुख्यमंत्र्यांना कर्जमाफी द्यायला काय हरकत आहे? हे सरकार नुसत्याच घोषणा करीत आहे. त्यामुळे २०१९ला कॉँग्रेस सत्तेवर आल्यावरच शेतकºयांना कर्जमाफी मिळेल.नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत कॉँग्रेसच राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. सध्या वातावरण बदलत असून, २०१९च्या निवडणुकीत विधानसभेवर कॉँग्रेसचा तिरंगा फडकविल्याशिवाय राहणार नाही.सतेज पाटील यांनी नोटाबंदी, जीएसटीनंतर कोल्हापुरात प्राधिकरणाच्या माध्यमातून पाण्याची दरवाढ करण्याचे पाप भाजपने केले आहे, असा घणाघात करत हे सरकार सहकार मोडून काढण्यासह विविध पेन्शन योजना बंद केल्याचा आरोपही केला. ‘अच्छे दिन’ फक्त मोदींनाच असून जनता अजूनही त्याच्या प्रतीक्षेत असल्याचा टोला लगावला. जिल्हा परिषद, ग्रामपंचायतीमधील मिळालेल्या घवघवीत यशानंतर पुढील लक्ष्य विधानसभा ठेवून कामाला लागावे, असे आवाहनही केले.यावेळी ऋतुराज पाटील, हणबरवाडीच्या सदस्य सुप्रिया वाडकर, टोप संभापूरचे सरपंच प्रकाश जिरंगे, दºयाचे वडगावे सदस्य अनिल मुळीक यांनी आपल्या मनोगतातून कोल्हापूर दक्षिणमध्ये कॉँग्रेसचा आमदार होऊन सतेज पाटील कॅबिनेट मंत्री होतील, असा विश्वास व्यक्त केला. संयोजक व पाचगावचे सरपंच संग्राम पाटील यांनी प्रास्ताविक केले.स्वत:चा किल्ला शाबूत नसणाºयांनीआम्हाला शिकवू नये : ऋतुराज पाटीलज्यांना आपला स्वत:चा किल्ला शाबूत ठेवता आला नाही, त्यांनी आम्हाला राजकारण शिकवू नये, असा टोला ऋतुराज पाटील यांनी आजी-माजी आमदार महाडिक यांचे नाव न घेता लगावला. तसेच सतेज पाटील यांची या निवडणुकीच्या निमित्ताने क्रिकेट मॅचप्रमाणे पहिली ओव्हर सुरू झाली असून, सर्वांच्या ताकदीवर २०१९ची निवडणूक जिंकणारच, असेही ते म्हणाले.भोगम-रामाणेंकडून चांदीची तलवार भेटउद्योगपती रामचंद्र भोगम व माजी नगरसेवक मधुकर रामाणे यांच्या कुटुंबीयांकडून आमदार सतेज पाटील यांना या कार्यक्रमात चांदीची तलवार भेट देण्यात आली. यावेळी कळंबा सरपंच सागर भोगम, माजी महापौर अश्विनी रामाणे, आदी उपस्थित होते.कळंब्याचे दोन अपक्ष सदस्य कॉँग्रेसमध्येया कार्यक्रमात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत कळंब्यातील विजय खानविलकर व राजेंद्र गुरव या अपक्ष निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांनी आपल्या समर्थकांसह कॉँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.हे सरकार आंधळे आणि बहिरेसध्याचे सरकार हे आंधळे आणि बहिरे असल्याचा टोला माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी लगावला. यासाठी त्यांनी काही दिवसांपूर्वी विदर्भातील कीर्तनकार हंडे महाराज यांच्या कीर्तनातील संदर्भाचा दाखला दिला.

टॅग्स :Politicsराजकारण